मणामणांचं ओझं असतं कधी साठलेलंकुठेतरी खोलखोल काहीबाही दाटलेलंहलकासा धक्का नकळत लागतोधो धो भरून कोसळायला लागतोपाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?जवळचा कुणी कधी लागेलसं बोलतोहळव्या हृदयाला जखम करून जातोआवरलं कितीही तरी डोळा भरून येतोघातलेला बांध अवचितच फुटतोपाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?कधी कधी मात्र जीव ओथंबून जातोकृतकृत्य होण्याचाही एक क्षण येतोमनातला आनंद आभाळभर सांडतोअश्रूंमधून झिरपत अंगणभर नाचतोपाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?मधुमती वऱ्हाडपांडे
आपलं मन म्हणजे जणू एक कॅलिडोस्कोपचअसतो. क्षणाक्षणाला त्यावर विविधरंगी प्रतिमा उमटत राहतात. त्यातल्या काहींना शब्दबद्ध केल्या जाते, कधी ललित, कधी कथा तर कधी कवितेच्या रूपात! व्यक्त होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.. !
Tuesday, June 30, 2020
पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हाट्सअपायन..!
अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...
-
पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो , काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही...
-
साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून ...
-
आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची...

2 comments:
👌👌🌧️
😊🙏🏻
Post a Comment